मार्च ते मे दरम्यानच्या काळात तापमान प्रचंड वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.
भारतीय हवामान खाते आणि केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयातर्फे 2016 पासून प्रत्येक ऋतूच्या सुरुवातीला हवामान अंदाज वर्तवण्यात येतो.
मल्टी मॉडेल एन्सेम्बल च्या आधारावर हा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
यावर्षी मार्च ते मे या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात उष्णतामान वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मार्च महिन्यात तापमानात वाढ होण्यास सुरुवात होणार असून राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ होणार आहे.
नागरिकांनी वाढत्या तापमानापासून वाचण्यासाठी पुरेपूर खबरदारी घ्यावी.