Aachar Sanhita 2024: आचारसंहिता म्हणजे काय?

Aachar Sanhita 2024
Aachar Sanhita 2024 (Image Source: Google)

Aachar Sanhita 2024: राज्यासह संपूर्ण देशात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. निवडणुकीच्या काळामध्ये सतत चर्चेत राहणारा विषय म्हणजे आचारसंहिता. परंतु सामान्य नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात जसे की आदर्श आचारसंहिता म्हणजे काय? त्याचे नियम आणि कायदे काय आहेत? आचारसंहिताची अंमलबजावणी कोण करते? आचारसंहिता लागू करण्याचा उद्देश काय? आचारसंहितेचा भंग झाल्यास काय होते? याव्यतिरिक्त या मुद्द्याशी जोडलेले अनेक प्रश्न असतात ज्याबद्दल नागरिकांनी जागृत राहिले पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया आदर्श आचारसंहिता म्हणजे काय?

Aachar Sanhita 2024: आचारसंहिता म्हणजे काय?

निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर केल्यानंतर राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी काय करावं आणि काय करू नये यासाठी ठरवलेले नियम म्हणजे आचारसंहिता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आचारसंहिता 1950 या वर्षी अंमलात आल्यानंतर आदर्श निवडणूक आचारसंहितेचाही स्वीकार करण्यात आला. निवडणूक कधी घ्यायची याची तारीख ठरवण्याचे संपूर्ण अधिकार हे निवडणूक आयोगाकडे असतात. साधारणतः मतदानाच्या तारखेच्या 21 दिवस अगोदर आचारसंहिता लागू होते आणि निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यावर लगेच आचारसंहिता ही लागू करण्यात येते.

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात निवडणुक हा एक सण मानला जातो आणि सर्व राजकीय पक्ष आणि मतदार या उत्सवात एकत्र सहभागी होतात. निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आणि निवडणूक लढवणारे उमेदवार वातावरण निर्मितीसाठी विविध प्रकारच्या युक्त्या वापरत असतात. विविध प्रकारचे राजकीय पक्ष व त्यांचे निवडणुकीतील प्रचारादरम्यानचे घोषवाक्य सतत कानावर पडून अगदी लहान मुले देखील खेळता खेळता त्यांची घोषवाक्य बोलायला लागतात.

Aachar Sanhita 2024
Aachar Sanhita 2024 (Image Source: Google)

आचार संहिता म्हणजे मार्गदर्शक तत्वे आहेत ज्याचे पालन सर्व राजकीय पक्षांनी केले पाहिजे. निवडणुकीतील प्रचार हा निष्पक्ष व्हावा आणि सत्ताधारी राजकीय पक्षांनी सत्तेचा गैरवापर करू नये हे प्रमुख उद्दिष्ट असते. आदर्श आचार संहिता हे राजकीय पक्ष आणि निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी आचार आणि वर्तनाचे मापदंड मानले जाते.

निवडणूक आयोग आदर्श आचारसंहिते बाबत वेळोवेळी राजकीय पक्षांशी चर्चा करत असते जेणेकरून त्यात सुधारणा करण्याची प्रक्रिया नियमितपणे सुरू राहते.

Aachar Sanhita 2024: आचार संहितेची गरज का होती?

निवडणुका जाहीर झाल्यावर प्रचाराची रणधुमाळी सुरू होते. निवडणूक ही लोकसभेची असो की विधानसभेची किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची प्रत्येक राजकीय पक्ष आणि निवडणुकीला सामोरे जाणारे उमेदवार हे त्यांचा प्रचार विविध मार्गाने करत असतात.

पूर्वी निवडणुकीच्या काळात वाहनांना लावलेले कर्कश्य भोंगे ज्यातून निवडणुकीचा प्रचार केला जात असे किंवा जेथे जागा मिळेल तेथे लावण्यात आलेले पोस्टर हे सर्वांना माहीतच आहे. पूर्वी निवडणूक जिंकण्यासाठी बूथ कॅप्चरिंग, मतपेटी पळवणे, दारू आणि पैसा खुलेआम वाटणे हे प्रकार उमेदवारांकडून घडत होते.

ज्या उमेदवारांकडे प्रचंड पैसा होता त्यांनी पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्यासाठी व निवडणुकीतील अडथळे दूर करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद यांचा वापर केला होता. त्यामुळेच कुठल्याही प्रकारची निवडणूक ही निष्पक्ष, सरळ मार्गाने आणि नियमांचे पालन करून होण्यासाठी आचारसंहिता खूप गरजेची होती. आचारसंहितेने सर्वच प्रश्न सुटणार नसून परंतु बऱ्याच बाबींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार होती.

Aachar Sanhita 2024: आचारसंहिता अस्तित्वात कशी आली?

1960 मध्ये केरळ राज्यात विधानसभेच्या निवडणुका दरम्यान पहिल्यांदाच राजकीय पक्ष आणि निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणुकीदरम्यान काय करावे आणि काय करू नये हे स्पष्ट करण्यात आले.

1962 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत प्रथमच निवडणूक आयोगाने सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांना आचार संहिता वितरित केली.

1967 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्य सरकारांना व राजकीय पक्षांना आचारसंहितेचे पालन करण्यास सांगण्यात आले.

Aachar Sanhita 2024: आचारसंहितेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

आपल्या देशाचा सर्वोच्च न्यायालयाने 2001 मध्ये दिलेल्या आपल्या एका निर्णयात म्हटले होते की निवडणूक आयोगाची अधिसूचना जारी झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू मानली जाईल.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आदर्श आचारसंहिता लागू होण्याच्या तारखेची संबंधित होणारा वाद कायमचा मिटला होता. आता निवडणूक आयोगाने अधिसूचनाचा अधिक केल्यानंतर लगेचच जेथे निवडणुका घ्यायच्या आहेत तेथे आदर्श आचारसंहिता लागू होते.

Aachar Sanhita 2024: आचारसंहितेचे नियम कोणते? निवडणुकीदरम्यान काय करावे आणि काय करू नये यांचे नियम

निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी आदर्श आचारसंहिता अंतर्गत काही नियमावली बनवलेली आहे जसे की सामान्य आचरण, सभेचे नियम, मिरवणुकीचे नियम, इत्यादी. जिथे निवडणुका जाहीर होतात तेथील राजकीय पक्ष व उमेदवारांची ही जबाबदारी असते की आचारसंहितेचा भंग होणार नाही.

Aachar Sanhita 2024
Aachar Sanhita 2024 (Image Source: Google)

आचारसंहितेचे नियम

भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 नुसार निवडणूक आयोगाकडे निवडणुकीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकार तसेच निवडणुकीला सामोरे जाणारे उमेदवार आणि सर्व राजकीय पक्ष यांच्यावर देखरेख करण्याचा अधिकार आहे.

निवडणुकीदरम्यान समाजात जाती, धर्म, वंश, भाषा यांच्या आधारे वाद निर्माण होतील किंवा फूट पडेल असे कोणतेही कृत्य, भाषण, प्रचार, घोषणा किंवा आश्वासने राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने देण्यास मनाई असते.

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या खाजगी आयुष्याचा उल्लेख करणे किंवा विरोधकांचा पुतळा जाळणे यावर मनाई आहे.

निवडणुकीचा प्रचार आणि सभा रात्री दहा वाजेच्या आतच संपवणे बंधनकारक असते.

मतदारांना महागड्या वस्तू भेट देणे, पैसे वाटणे आणि विविध प्रकारचे आमिष दाखवणे यासाठी मनाई आहे.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही नवीन योजनेची घोषणा करता येणार नाही व तसेच कुठल्याही योजना किंवा इमारतीचे अनावरण, लोकार्पण किंवा भूमिपूजन केले जाऊ शकत नाही.

एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाला फायदा होईल असे कुठलेही काम सरकारी खर्चातून केले जाऊ शकणार नाही.

कोणत्याही पक्षाला सरकारी वाहने विमाने आणि हेलिकॉप्टरचा निवडणुकीच्या प्रचारासाठी वापर करता येणार नाही.

कुठल्याही राजकीय पक्षाला सरकारी मालमत्ता तसेच सरकारी गेस्ट हाऊस मध्ये हक्क गाजवता येणार नाही.

राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांना बैठका, सभा, संमेलन किंवा रॅली काढण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घेणं आवश्यक आहे.

हेही वाचा: नागरिकत्व दुरुस्ती कायदा CAA म्हणजे काय?

आचारसंहितेच्या काळात सरकारला किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाला नवीन घोषणा करता येणार नाही तसेच त्यासाठी निधी जाहीर करता येणार नाही.

नागरिकांच्या खाजगी मालमत्तेचा किंवा जमिनीचा विनापरवाना वापर कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला करता येणार नाही.

कुठल्याही राजकीय पक्षाला प्रतिस्पर्धी पक्षाच्या भाषणात, रॅलीत, प्रचार सभेत, मिरवणुकीत कुठल्याही प्रकारचा अडथळा आणण्यास परवानगी नाही.

धार्मिक स्थळांचा वापर निवडणुकीच्या प्रचाराचे मंच म्हणून करता येणार नाही.

मंत्र्यांना शासकीय दौऱ्यांच्या वेळी निवडणुकीचा प्रचार करता येणार नाही. तसेच सरकारी बंगला किंवा सरकारी पैशांचा वापर प्रचारासाठी करता येणार नाही.

Aachar Sanhita 2024
Aachar Sanhita 2024 (Image Source: Google)

सरकारी पैसा वापरून जाहिराती देता येणार नाही.

मतदारांवर खूप प्रमाणात परिणाम होईल असे वचन जाहीर नाम्यात देता येणार नाहीत.

कुठल्याही व्यक्तीकडे 50 हजारांपेक्षा अधिक रोकड किंवा दहा हजार रुपयांपेक्षा अधिकचे भेटवस्तू सापडल्यास कारवाई केली जाऊ शकते.

या काळात कुठल्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची बदली करता येणार नाही. अत्यावश्यक असल्यास त्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागेल.

मंत्री सरकारी खर्चावर होणाऱ्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे अतिथी म्हणून सहभागी होऊ शकत नाहीत.

मतदान केंद्रात कर्मचारी, अधिकारी आणि मतदार यांच्या व्यतिरिक्त कुणाला जाण्याची परवानगी नसेल.

मतदान केंद्र पासून 100 मीटर अंतरापर्यंत कार्यकर्ते आपल्या पक्षाचा प्रचार करू शकत नाहीत.

Aachar Sanhita 2024
Aachar Sanhita 2024 (Image Source: Google)

मतदानाच्या किमान 48 तास आधी ज्याला मौन कालावधी देखील म्हटले जाते स्टार प्रचारक आणि इतर राजकीय नेत्यांनी पत्रकार परिषदद्वारे मीडियाला संबोधित करणे आणि निवडणुकीच्या विषयावर मुलाखती देणे टाळावे.

मतदान होण्याच्या शेवटच्या 48 तास आधी राजकीय पक्ष आपला जाहीरनामा किंवा पुरवणी जाहीरनामा प्रसिद्ध करू शकत नाहीत.

निवडणुकीच्या 48 तास आधी ज्याला शांतता कालावधी असे म्हणतात तेव्हा सर्व निवडणूक प्रचार संबंधित किंवा निवडणुकीशी संबंधित कार्य थांबवले जावे आणि नागरिक, पत्रकार, राजकारणी, इत्यादींसह कोणालाही निवडणुकीच्या कुठल्याही प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.

निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्यास उमेदवार तसेच राजकीय पक्षांवर कारवाई केली जाऊ शकते.

आचारसंहिता दरम्यान प्रशासकीय कामांवर फरक पडतो का?

निवडणूक प्रक्रियेदरम्यान म्हणजेच आचारसंहिता कालावधीत बऱ्याचदा नागरिकांना विचित्र अनुभव येत असतात. काही सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी आचारसंहितेचे कारण देऊन काम करण्यास टाळतात.

आचार संहिता सुरू असताना विवाह नोंदणी, जन्मदाखला, मृत्यू दाखला, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, उत्पन्नाचा दाखला, अशी बरीच सरकारी कामे करायला गेल्यावर काही सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी आचारसंहितेचे कारण देऊन काम करण्यास टाळतात. कोणाला ना कोणाला हा अनुभव आलेला असेलच. परंतु आचारसंहितेचा आणि या कामांचा कुठलाही संबंध नसतो. सगळी प्रशासकीय काम आचारसंहितेत करता येतात. आचारसंहितेच्या काळात नागरिक म्हणून आपण ही कामे करू शकतो फक्त कुठल्याही सरकारी योजनांचा लाभ आपल्याला आचारसंहितेमध्ये घेता येणार नाही.

आपली लोकशाही प्रत्येक निवडणुकीने सुधारत जाते पण निवडणूक आयोगाच्या प्रयत्नांसोबतच लोकशाहीचा हा उत्सव यशस्वी करण्याची जबाबदारी देशातील नागरिकांची देखील असते.

निष्कर्ष:

निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर केल्यानंतर राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी काय करावं आणि काय करू नये यासाठी ठरवलेले नियम म्हणजे आचारसंहिता.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न:

1. निवडणूक आचार संहिता म्हणजे काय?

निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर केल्यानंतर राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी काय करावं आणि काय करू नये यासाठी ठरवलेले नियम म्हणजे आचारसंहिता.

2. निवडणूक आचार संहिता किती दिवसांची असते?

निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्यापासून ते मतदान मोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आचार संहिता लागू असते.

माहिती आवडली असल्यास पुढे शेअर करा.

Leave a comment