व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा खजिना असलेले नारळ पाणी शरीरातील विषारी घटक काढून टाकते. नारळ पाणी पिल्याने शरीराला विविध प्रकारचे फायदे होत असतात.
उन्हाळ्यात घाम येऊन निर्जलीकरण होऊ शकतं. नारळ पाणी हे इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजांचा उत्तम स्रोत आहे, त्यामुळे शरीरातील द्रवपदार्थांची पातळी राखण्यास मदत होते.
नारळ पाण्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, अँटिऑक्सिडंट्स आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे घटक असतात ज्यामुळे शरीराला संसर्गापासून बचाव करण्यास मदत होते.
नारळ पाण्यात पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे रक्ताभिसरण आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते.
नारळ पाण्यात असलेले फायबर पचनक्रिया सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करते तसेच शरीरातील पीएच पातळी संतुलित करते.
नारळ पाणी त्वचेला हायड्रेट करते आणि लवचिकता प्रदान करते. केसांना मजबूत आणि चमकदार बनवण्यासाठीही ते फायदेशीर आहे.
उष्णतेमुळे थकवा आणि कमकुवतपणा जाणवू शकतो. नारळ पाण्यातील नैसर्गिक साखर आणि इलेक्ट्रोलाइट्स त्वरित ऊर्जा देतात आणि दिवसभर उत्साही राहण्यास मदत करतात.
नारळ पाणी कमी कॅलरीज आणि चरबीयुक्त असते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ते फायदेशीर आहे. नारळ पाणी मूत्रपिंडातील दगड ( किडनी स्टोन ) आणि मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका कमी करते.