CAA म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती कायदा लोकसभा निवडणूक 2024 च्या आधी सरकारकडून लागू केली जाण्याची शक्यता आहे.
Image Source: Google
या कायद्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील भारतात आलेल्या हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख या अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे.
Image Source: Google
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे 1955 सालच्या कायद्यात दुरुस्ती केले गेलेले आहे, ज्याद्वारे मुस्लिम देशांमधून भारतात सीमा ओलांडून आलेल्यांना बेकायदेशीर स्थलांतरित मानले जाणार नाही.
Image Source: Google
पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशातील लोकच नागरिकत्वासाठी अर्ज करण्यास पात्र असतील. इतर देशातील अल्पसंख्यांक समुदायातील लोकांना CAA चा लाभ मिळणार नाही.
Image Source: Google
परंतु काही समुदायांमध्ये अशी भीती आहे की CAA आणी NRC कायद्यामुळे त्यांचे दुर्लक्ष, बहिष्कार आणि अगदी हद्दपार होऊ शकतात. या कायद्याचा भारतीय नागरिकांवर काही परिणाम होणार नाही.
Image Source: Google
जेव्हापासून CAA आणी NRC चा मुद्दा समोर आला तेव्हापासून या मुद्द्याचे जोरदार राजकारण झाले आहे. CAA बाबत देशभरात मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली होती.
Image Source: Google
संसदेत 2016 साली पहिल्यांदा नागरिकत्व दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आले होते. 8 जानेवारी 2019 रोजी लोकसभेत अखेर मंजूर झाले होते. परंतु या विधेयकाची अंमलबजावणी झालेली नव्हती.
Image Source: Google