भारत हा एकमेव असा देश आहे की जिथे भगवंताचे अनेक अवतार झालेत. या पवित्र भूमीवर विविध भागांमध्ये मानवकल्यानासाठी अनेक महापुरुषांनी व संतांनी जन्म घेतला.

Image Source: Instagram

नाशिक जिल्ह्यातील अंतापुर गावी चिमणाजी नावाचे निसंतान गृहस्थ राहत होते. चिमणीजीनां एकदा भगवान शंकरांनी स्वप्नात दृष्टांत दिला की रानात तुला तुझे बाळ मिळेल ते घेऊन ये.

Image Source: Instagram

दृष्टांताप्रमाणे 1785 च्या कार्तिक शुद्ध अष्टमीच्या पहाटे रानात चिमणीजीनां दिव्य बाळ मिळाले. भगवान शंकरांनी दिलेला प्रसाद म्हणून चिमणीजीनीं त्या बाळाचे नाव शंकर असे ठेवले.

Image Source: Instagram

बालपणी शंकर महाराजांनी अनेक लीला दाखविल्यात. काही वर्ष अंतापुर येथे आई-वडिलांजवळ राहून त्यांना पुत्र प्राप्तीचा आशीर्वाद दिला आणि ते तिथून बाहेर पडले.

Image Source: Instagram

शंकर महाराज हे श्री स्वामी समर्थांना आपले गुरु मानत होते. अवतारकार्यात त्यांनी अनेक ठिकाणी भ्रमण केले. सिद्धींचे चमत्कार करणारे आपले कर्म बदलणारे नसतात अशी शिकवण त्यांनी भक्तांना दिली.

Image Source: Instagram

मैं कैलास का रहने वाला, मेरा नाम है शंकर हे शंकर महाराजांचे शब्द. शंकर महाराजांचा आवडता नंबर 13 होता. ते म्हणत सब कुछ तेरा कुछ नही मेरा.

Image Source: Instagram

ते म्हणत, भावनेने भिजलेले असेल, ते भजन. महाराजांचा डावा पाय मोठा तर उजवा पाय लहान होता. ते म्हणत की डावा पाय स्वामींचा उजवा पाय माझा आहे.

Image Source: Instagram

श्री शंकर महाराज हे साक्षात भगवान शंकराचे अवतार होते. शंकर महाराजांचे अवतार कार्य अतिशय महान होते. नैराश्य, संकटाने ग्रस्त झालेल्या मानवाला त्यांनी योग्य मार्ग दाखविला. 

Image Source: Instagram

भक्तांना ज्ञानमार्ग दाखवणाऱ्या शंकर महाराजांनी वैशाख शुद्ध अष्टमी 26 एप्रिल 1947 रोजी पुणे येथील धनकवडी भागात समाधी घेतली. यावर्षी 15 मे 2024 रोजी महाराजांची पुण्यतिथी आहे.

Image Source: Instagram