विनायक दामोदर सावरकर हे भारताचे महान स्वातंत्र्य सेनानी, क्रांतिकारक, समाजसुधारक इतिहासकार, नेते आणि विचारवंत होते. स्वातंत्र्यवीर आणि वीर सावरकर या नावाने लोक त्यांना ओळखतात.

Image Source: Google

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिकच्या भगूर गावात झाला. सावरकरांना लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. त्यांनी लहान असताना काही कविताही लिहिल्या होत्या.

Image Source: Google

नाशिक मधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केलेले सावरकर वकील, राजकारणी, लेखक आणि कवी देखील होते. स्वातंत्र्यलढ्याच्या  काम करण्यासाठी सावरकरांनी मित्र मेळा ही एक क्रांतिकारक संस्था स्थापन केली होती.

Image Source: Google

मित्रमेळा ही भारतातील पहिली सशस्त्र क्रांतिकारी संघटना आहे. सावरकरांनी मित्रमेळा संघटनेचे अभिनव भारत या संघटनेमध्ये रूपांतर केले.

Image Source: Google

भारताची सामूहिक हिंदू म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी हिंदुत्व हा शब्द तयार केला होता.

Image Source: Google

सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळा पाण्यावर धाडले. या घटनेचा निषेध म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा यांनी कर्झल वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे व त्यांच्या साथीदारांनी जिल्हाधिकारी जॅक्सन याला गोळ्या घालून ठार केले.

Image Source: Google

नाशिकच्या जिल्हाधिकारी जॅक्सनला मारण्यासाठी पिस्तुले सावरकरांनी पुरवली होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना अटक केली.

Image Source: Google

सावरकरांना दोन जन्मठेपांची काळ्यापाण्याची शिक्षा थोठविण्यात आली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ब्रिटिश सरकारने अंदमानच्या काळकोठडीत ठेवले होते.

Image Source: Google

अंदमानच्या काळ कोठडीत सावरकरांचा ब्रिटिश सरकार ने मरणप्राय वेदना देत छळ केला जसे की नारळाच्या काथ्या कुटणे, तेलाच्या घाण्याला जुंपणे इत्यादी.

Image Source: Google

भारताच्या स्वातंत्र्यासाठी मरणप्राय वेदना सहन करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे 26 फेब्रुवारी 1966 रोजी निधन झाले. 

Image Source: Google

आजही सावरकरांनी लिहिलेले गीत "सागरा प्राण तळमळला" ऐकल्यावर सावरकरांचा संघर्ष डोळ्यासमोर येतो आणि अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही...

Image Source: Google